वाठार ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकऱ्यांना वृक्ष वाटप
वाठार,(प्रकाश कांबळे):-वातावरणात होत असलेल्या बदलामुळे वृक्षारोपण करणे त्याचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे मत सरपंच सागर कांबळे यांनी व्यक्त केले ते वाठार ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील शेतकऱ्यांना आंबा झाडे वाटप प्रसंगी बोलताना बोलत होते.
यावेळी ग्रामविकास अधिकारी डी.डी.शिंदे म्हणाले की आपण शेतकऱ्यांना आंबा झाडे मोफत वाटत करीत आहोत ही दिलेली झाडे जगऊन पुढील वर्षी त्या झाडाचा फोटो दाखवल्यास पुढील वर्षी ही त्या शेतकऱ्यांला मोफत झाड दिले आहे जाईल.
यावेळी उपसरपंच गजेंद्र माळी,ग्रा.पं.सदस्य सुहास पाटील, सचिन कुंभार,रेश्मा शिंदे, रुक्सना नदाफ संदीप चौगुले, बी एस पाटील,गोविंद शिंदे,श्री दत्त सोसायटी संचालक विजय माने,सुगंध कांबळे, गजानन कुंभार, ग्रामपंचायत क्लार्क विशाल कांबळे, शिवाजी गायकवाड, महेश कुंभार,सुनील कांबळे,यांच्या सह शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.