सर्प दंशाने मंगरायाचीवाडी येथील महिलेचा मृत्यू
पेठ वडगांव,(प्रकाश कांबळे):-पेठ वडगांव मधील मंगरायाचीवाडी येथे दुसऱ्याच्या शेतातील ऊसाचा पाला काढण्यासाठी गेलेल्या अंजना बच्चन पवार (वय48)यांचा सर्प दंशाने मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की मंगरायाचीवाडी येथील सुमारे 15 लोक त्या मध्ये महिला पुरुष असे आज सकाळी 7 वाजता असे रोजच एकत्र रोजनंदारी वर दुसऱ्याच्या शेतात कामाला जातात. आज सकाळी नेहमी प्रमाणे त्या सर्वांसोबत ऊसाचा पाला काढीत असताना त्यांच्या पायाला कधी घोनस जातीच्या सापाने चावा घेतला हॆ त्या महिलेला समजलं नाही त्या इतर महिला समवेत कामच करीत राहिल्या 15 ते 20 मिनिट झाल्यानंतर त्या महिलेला आपला पाय जड वाटू लागला त्यामुळे इतर लोकांना त्यानी सांगितलं की मला पाय जड वाटायला लागलाय इतर लोक त्या महिलेजवळ जमा झाले त्यांनी इकडे तिकडे पहिले असता घोनस जातीचा साप त्यांना दिसला लगेच त्यांनी त्या महिलेस उपचार करण्यासाठी कोल्हापूर येथील डॉ.डी.वाय पाटील हॉस्पिटल मध्ये पाठवले पण उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पाठी मागे पती,दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.