नवे पारगाव येथे कृषिकन्यांचे
स्वागत
नवे पारगाव : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथील चौथ्या वर्षात शिकत असलेल्या नेहा कशाळे, निकिता क्षिरसागर, समृद्धी माकर, स्मृती काळे, सिद्धी माडकर, सुजल कदम या कृषिकन्या नवे पारगाव येथे सहा महिने करिता गावात राहून ‘ग्रामीण (कृषि ) जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम 2025-26 खरीप’ कार्यक्रम राबविणार आहेत. या कार्यकामा अंतर्गत गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत व तसेच पुढील सहा महिने त्यांची जीवनशैली समजुन घेणार आहेत. शेतकऱ्यांच्या पीक पद्धतीचा अभ्यास करून प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. कृषिकन्या यांचे
ग्रामपंचायतिच्या वतीने स्वागत करण्यात आले. सदर स्वागत कार्यक्रमास विद्यमान सरपंच सौ. वर्षाराणी देशमुख, उपसरपंच श्री. विश्वास पाटील,ग्रामविकास अधिकारी श्री. म्हस्के सर व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व शेतकरी वर्ग उपस्थित होते. यादरम्यान सहयोगी अधिष्ठाता डॉ. ए. ए. पिसाळ, समन्वयक डॉ. बी. टी. कोलगणे, कार्यक्रम अधिकारी डॉ. जे. के.जोशी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कृषिकन्या स्मृती काळे व समृद्धी माकर यांनी सर्व कृषिकन्यांच्यावतीने ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.