विजेच्या धक्क्यांने वाठार येथील दोन गायी दगावल्या
पेठ वडगाव,(प्रकाश कांबळे) :- वाठार (ता.हातकणंगले) येथील साखरवाडी येथे एमएसएबी सबस्टेशन समोर भिकाजी आनंदा पेटकर यांचा गोटा आहे या गोठ्यामध्ये पाच मोठ्या गायी व एक कालवड असून गोट्याला लागूनच पाठीमागे मुक्त गोटा केला आहे. सकाळ नेहमीप्रमाणे यामध्ये चार गायी मुक्त गोट्यात सोडल्या होत्या दुपारी त्यांना वैरण टाकून भिकाजी पेटकर वाठार येथे असणाऱ्या घरी गेली होते. वाठार गावातून गोटा 1 किलो मीटर अंतरावर आहे दुपारी वाठार सह परिसरात मोठया प्रमाणात पाऊस पडल्याने मुक्त गोट्याला असणाऱ्या तारेच्या कंपाउंड मध्ये विजेचा करंट उतरला चार गायी मधील दोन गायी मुक्त गोट्यातील दरवाज्या जवळ आल्याने त्यांना विजेचा जोराचा धक्का लागल्याने जागीच मरण पावल्या तर त्या मधील दोन गायी बाजूला थांबल्याने त्या वाचल्या गोट्या शेजारी असणाऱ्या लोकांनी ही माहिती भिकाजी पेटकर यांना फोन वरून कळवली गावातून आल्यानंतर पहिले असता कपाउंड ला करंट येत होता. ताबडतोब ही माहिती एमएसएबी ला कळवली लगेच वायरमन येऊन विजेच्या खांबावरून कनेक्शन सोडूवून घेतलं व आतील दोन जिवंत गायी बाहेर काढल्या मरण पावलेल्या दोन्ही गायी गाभण होत्या. या मध्ये शेतकऱ्याचे 2 लाख 40 हजार रुपयांची नुकसान झाले आहे ही माहिती मिळताच ग्राममहसूल अधिकारी विकास मोहिते, महसूल सेवक दीपक शिंदे, सचिन पोवार, पोलीस पाटील सुगंध समुद्रे यांनी येऊन पंचनामा केला. यावेळी महावितरण वाठार सेक्शन ऑफिसच्या सहायक अभियंता सारिका गुजले, वडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, वारणा दुध संघाचे संचालक महेंद्र शिंदे यांनी गोट्यास भेट दिली यावेळी प्रतीक शिंगे, रुपेश पाटील, अक्षय पाटील, दादासो शिंदे, महेश झेंडे, अमोल शिंदे यांच्या सह अनेक लोक उपस्थित होते.