यशवंत ग्रामपंचायत पुरस्काराने ग्रामपंचायत पाडळी सन्मानित
अंबप,(प्रतिनिधी):- पाडळी (ता.हातकणंगले) गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती निमित्त जिल्हा परिषद, कोल्हापूर यांचेकडून देण्यात येणाऱ्या यशवंत ग्रामपंचायत पुरस्काराने ग्रामपंचायत पाडळीस सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारताना सरपंच सौ.ऐश्वर्या पाटील, उपसरपंच शिवाजी जाधव, ग्रामसेवक प्रभाकर परीट, सदस्य सौ.डॉ.विभा पाटील, सौ.सुजाता पाटील, सौ.भाग्यश्री गायकवाड, रवींद्र पाटील,श्रीधर पाटील, कोंडीबा पोवार,निवृत्ती वाघमोडे तसेच कामधेनू दूध संस्थेचे चेअरमन मोहन पाटील, विनोद पाटील, व्ही.बी. पाटील सर, धनंजय देसाई सरकार, राजेन्द्र मुळीक, निवृत्ती गायकवाड, अजित पाटील, धनाजी दाभाडे, लिपिक आश्विन गुरव, संतोष पोवार व कर्मचारी पांडुरंग मुळीक उपस्थित होते.