एकरकमी एफ.आर.पी. व 50 हजार सानुग्रह अनुदान घेणारच अन्यथा रस्त्याच्या लढायला सरकारने सामोरे जावे- मा.खास. राजू शेट्टी 

    Advertisements

    एकरकमी एफ.आर.पी. व 50 हजार सानुग्रह अनुदान घेणारच अन्यथा रस्त्याच्या लढायला सरकारने सामोरे जावे- मा खास राजू शेट्टी

    Advertisements

     

    कुंभोज वार्ताहर (विनोद शिंगे) कुंभोज ता हातकलंगले येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जागर एफ आर पीचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्याचे अध्यक्षांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेते माजी खासदार राजू शेट्टी हे होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात पूरोगामी चळवळीतल्या नेत्यांच्या फोटो पूजनाने करण्यात आली.

    यावेळी अध्यक्ष भाषणात बोलताना खासदार राजू शेट्टी म्हणाले की तुकड्यांने एफ आर पी घेणार नाही एफआरपी ही एक रकमेच घेणार न दिल्यास रस्त्यावरच्या लढाईला सरकारने तयार राहावे. परिणामी स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी एकवटला आहे. काही कारखानदार साखर कारखाने चालू करण्याची भाषा करत आहेत, परिणामी शेतकरी संघटनेचे मागण्यांचे जो प्रयत्न मिटत नाही तोवर ऊसाच्या कांडक्याला हात घालून देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला .तसेच एफ आर पी चा कायदा केंद्र सरकारने लागू केला असून ,त्यात बदल करून राज्य सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. एफ आर पी च्या कायद्यात बदल करून शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचे सरकारचा घाट आहे. सगळीकडे डिजिटल माध्यमांचा वापर केला जात असताना साखर कारखान्याचे काटे मात्र कारखानदारांच्या ताब्यात त्याच्यावरती डिजिटल काटे बसवून त्याच्यावर साखर आयुक्तांचे नियंत्रण असावे अशी मागणी साखर संचालकाकडे केली आहे. साखर कारखानदारांची चाललेली राजरोसपणे काटेमारी थांबवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्यातील सर्व साखर कारखाने दीड ते अडीच टनाने शेतकऱ्यांच्या ऊसाचे काटे मारत असून त्यामध्ये त्यांना साडेचार हजार कोटी रुपये चा फायदा झाला आहे हे पैसे व साखर काळा बाजाराने विक्री करून सरकारचा जीएसटी बुडवला जात असून आपण आयकर विभागाकडे साखर कारखान्याच्या गोडाऊनची तपासणी करण्याची मागणी केली आहे. परिणामी यावर्षी ऊस तोडणी मजुरांना कोणत्याही शेतकऱ्यांनी ऊसतोडणीसाठी पैसे देऊ नयेत व जो शेतकरी पैसे देऊन ऊस तोडेल त्याचा जाळूनच कारखान्यात घातला जाईल असा इशाराही त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

    वीस वर्षांपूर्वी शेतकऱ्याचे असणारे प्रश्न वेगळे होते वय चालू वर्षात शेतकऱ्याचे प्रश्न वेगळे आहेत ऊसाला जरी भाव मिळत असला तरी सरकारने खते बियाणांचे दर प्रचंड वाढवले असून कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सदर पैसे शेतकऱ्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना व महापुरामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती ढासळली असून चार चाकीतून खेळणारा शेतकरी मेळाव्यासाठी ट्रक मधून येत आहे हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.

    परिणामी यावर्षीची एफ आर पी व ऊस दराची लढाई ऐतिहासिक असेल त्यासाठी टोकाचा संघर्ष करावा लागेल. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रात येणाऱ्या दोन महिन्यात जागृती मेळाव्यांचे आयोजन करावे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास भडका उडणार व चळवळ तीव्र करणार परिणामी साखर कारखान्याचे चेअरमनच जिल्हा बँक व सरकारी बँकेचे संचालक असून बँकांच्या माध्यमातून स्वतःचे खिसे भरून घेण्याचे काम चालू आहे. जिल्हा बँक व कारखान्याच्या माध्यमातून 3000 कोटीचा मलिदा खात असल्यामुळेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मताचा दर एका मताला 15 लाख रुपये झाला आहे. ही जिल्ह्यातील बँकेची बांडगूळ शेतकऱ्यांनी पोसायची का त्यासाठी नाबार्ड कडून कर्ज का घेत नाहीत .त्यांच्याकडून कर्ज घ्या.आता मस्तीत जगायचं तर सुस्ती सोडावी लागेल.

    गटातटाचे राजकारण न करता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र येऊन संघर्षाला तयार राहा असे आव्हाने खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित शेतकरी वर्गाला केले. यावेळी हातकणगले तालुक्यातून हजारो शेतकरी कुंभोज येथे उपस्थित झाले होते. यावेळी ग्रामपंचायत कुंभोज यांच्या वतीने खासदार राजू शेट्टी, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब एडके, अजित पवार, रमेश भोजकर ,राजाराम देसाई ,सरपंच दिपाली गोंधळी आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

    यावेळी किरण माळी ,श्रीकांत माळी ,कोंडीबा भानुसे जंबु भोकरे, प्रकाश पाटील, आदिनाथ पाटील, जालिंदर कोळी, पंकज पाटील, राजू तोरस्कर, भरत भोकरे ,अजीत देवमोरे, अमरजीत बंडगर ,सचिन कोळी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सर्व ग्रामपंचायत महिला सदस्य व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे, माजी सरपंच माधुरी घोदे , प्रकाश पाटील व आभार किरण माळी यांनी मानले.

     

    चौकट- साखर कारखान्यात काटा मारल्यामुळेच, जिल्हा बँकेत मताला 15 लाख रुपये दर, साखर सम्राट यांच्या ताब्यात जिल्हा बँका, ऊस तोडणी साठी ऊस कामगारांना एकहि रुपया देऊ नका जे शेतकरी पैसे देतील त्यांचा ऊस जाळूनच कारखान्यात घालवला जाईल. शेतकऱ्यांना शेट्टींचा इशारा. दसऱ्यापूर्वी शेतकऱ्याला पन्नास हजार सानुग्रह अनुदान न मिळाल्यास सरकारने रस्त्याच्या लढाईला तयार राहावे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मा.खासदार राजू शेट्टी यांचे सरकारला आवाहन

    Advertisements
    Advertisements