Home Breaking News बाजार समित्यांनी उत्पन्न वाढीकडे लक्ष केंद्रीत करावे….

बाजार समित्यांनी उत्पन्न वाढीकडे लक्ष केंद्रीत करावे….

Advertisements

बाजार समित्यांनी उत्पन्न वाढीकडे लक्ष केंद्रीत करावे….

Advertisements

 

 

पुणे : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव- दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांगली जिल्ह्यातील ७ बाजार समितींच्या सभापती, उपसभापती, संचालक, सचिव यांचेकरीता एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. बुधवार दि.११/०६/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सांगली श्री. मंगेश सुरवसे यांच्या हस्ते कार्याशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कृषि पणन मंडळ कोल्हापूरचे विभागीय उपसरव्यवस्थापक डॉ.सुभाष घुले, डी.एम.आय.चे श्री.अच्युत सुरवसे, सहकार विभागाचे अधिकारी तात्यासाहेब मुरूडकर, पणन मंडळाचे अधिकारी ओंकार माने, शेखर कोंडे, नवनाथ मोरे, बाजार समितींचे पदाधिकारी व पणन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ.सुभाष घुले यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करत बाजार समित्यांनी आपल्या उत्पन्न वाढीकडे लक्ष देणे, पायाभूत सुविधा उभारणे, आटपाडी बाजार समिती प्रमाणे जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांनी राज्य स्तरीय रॉंकींगमध्ये पहिल्या २५ मध्ये येण्याच्या दृष्टीने कामकाज करणे आवश्यक आहे असे सांगीतले. यावेळी राज्यस्तरीय रॅाकींगमध्ये आटपाडी बाजार समितीचा कोल्हापूर विभागात पहिला क्रमांक आला म्हणून बाजार समितीचे सभापती श्री संतोष पुजारी व सर्व दाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डीएमआयचे अच्युत सुरवसे यांनी डारेक्टरेट ऑफ मार्केटींग यांच्या बाजार समिती व शेतकरी यांच्याकरीता असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. सहकार विभागाचे तात्यासाहेब मुरूडकर यांनी बाजार समितीचे अधिकार व जाबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले, डॅा.सुभाष घुले यांनी पणन मंडळाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले, पणन मंडळाचे श्री.ओंकार माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Advertisements
Advertisements