Home Breaking News शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांना शांतीदूत सेवा रत्न पुरस्काराने गौरव

शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांना शांतीदूत सेवा रत्न पुरस्काराने गौरव

Advertisements

 

शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांना शांतीदूत सेवा रत्न पुरस्काराने गौरव

Advertisements

 

राहुरी, (जि.अहमदनगर) येथील सुप्रसिद्ध शिवशाहीर, व्याख्याते आणि समाजसेवक डॉ. विजय तनपुरे यांची शांतीदूत परिवारातर्फे “सेवारत्न पुरस्कार” या मानाच्या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त दिनांक २६ जून २०२५ (गुरुवार) रोजी LOC हॉस्पिटल, नवी पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान, रोगनिदान व अवयवदान जनजागृती अभियान कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन शांतीदूत परिवाराचे संस्थापक आणि माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

डॉ. विजय तनपुरे हे वयाच्या दुसऱ्या वर्षी पोलिओमुळे एका पायाने अपंग झाले. मात्र या शारीरिक मर्यादेला बाधा न मानता त्यांनी गेली ३८ वर्षे महाराष्ट्रात, देशात आणि परदेशात शिवचरित्राचे पोवाडे, कीर्तन आणि व्याख्यानांच्या माध्यमातून प्रभावी कार्य केले आहे. शिवाजी महाराजांचे विचार, पराक्रम आणि राष्ट्रप्रेम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आयुष्य झोकून दिले आहे.

केवळ सांस्कृतिक कार्यातच नव्हे तर दिव्यांगांसाठी सामाजिक कार्यातही त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी स्वतःसारख्या दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी राहुरी येथे ४२०० स्क्वेअर फूट क्षेत्रफळाचे “शिवाश्रम” उभारले असून त्याचे लोकार्पण २५ डिसेंबर २०१९ रोजी करण्यात आले. या आश्रमातून अनेक दिव्यांगांना रोजगार, शिक्षण आणि आत्मविश्वास मिळाला आहे. सध्या ते मनाने खचलेल्या सामान्य व्यक्तींना सशक्त आणि यशस्वी बनवण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांचे ध्येय आहे – २०,००० व्यक्तींना यशस्वी उद्योजक बनवणे.

आजवर त्यांना कलारत्न पुरस्कार, अपंग उद्योजक पुरस्कार, तसेच दिनांक १२ जानेवारी २०१६ रोजी सिंदखेडराजा येथे छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजी महाराज आणि तंजावूरचे छत्रपती बाबाजीराजे भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला “विश्वशिवशाहीर पुरस्कार” अशा अनेक राष्ट्रीय सन्मानांनी गौरवण्यात आले आहे.

“शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे” हे केवळ एक व्यक्तिमत्व नसून संघर्षातून यशाकडे नेणाऱ्या जिद्दीचे, शिस्तीचे आणि सेवाभावाचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. शांतीदूत सेवारत्न पुरस्काराने त्यांच्या समाजोपयोगी कार्याचा गौरव होणार आहे, ही समाजासाठीही अभिमानाची बाब आहे.

Advertisements
Advertisements