Home Breaking News सावकाराचा जाचाला कंटाळून कुटुंबाचा आत्मदहनाचा इशारा

सावकाराचा जाचाला कंटाळून कुटुंबाचा आत्मदहनाचा इशारा

Advertisements

सावकाराचा जाचाला कंटाळून कुटुंबाचा आत्मदहनाचा इशारा,

Advertisements

खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल होऊनही सावकार मात्र मोकाटच.

मुख्यमंत्र्यांकडे दुसऱ्यांदा तक्रार.

 

 

कळे,प्रतिनिधी(अनिल सुतार यांजकडून):- खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून आकुर्डे तालुका पन्हाळा येथील विठ्ठल आनंदराव पाटील यांनी कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे.

मुख्यमंत्र्यासह पोलिसांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कळे तील खाजगी सावकार अशोक राजाराम पाटील व अवधूत अशोक पाटील यांनी त्रास देऊन २९ लाख रुपयांची ज्यादा वसुली केली आहे. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर सावकारांनी २७ लाख रुपये परत केले. पण त्यानंतर लगेचच त्यांनी माझ्या मुलाचे अपहरण करून आणि मला धमकावून परत दिलेले सर्व पैसे काढून घेतले याबाबत मी कळे पोलीस ठाण्यात सावकार आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध तक्रार दिली आहे मात्र माझ्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. त्यामुळे मी कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषण सुरू केले होते. त्याची दखल घेऊन सावकारांविरुद्ध अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला. पण गुन्हा फक्त कागदोपत्री नोंदविला गेला. पोलिसांनी त्यांना वेळीच अटक न केल्यामुळे अटकपूर्व जामीन मिळाला. त्यानंतर या सावकारांनी व त्याच्या साथीदारांनी मला पुन्हा त्रास देऊन धमक्या द्यायला सुरुवात केली आहे. याबाबत ही मी कळे येथील पोलीस ठाण्यात अनेक वेळा तक्रारी दिल्या. पण तक्रारीची दखल घेतली जात नाही.त्यामुळे या खाजगी सावकाराच्या व त्याच्या साथीदारांच्या त्रासाला वैतागून मी मार्च महिन्यात आत्महत्येचा प्रयत्न केला पण सुदैवाने मी त्यातून वाचलो.याबाबत ही कळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पण त्याचीही दखल घेतली गेली नाही. मी सहकार विभागाकडे ही पुराव्यानिशी तक्रार केली असता वर्षभराने छापे टाकले. पण पुढे काहीच झाले नाही त्यानंतर याप्रकरणी दहा दिवसांच्या आत कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले होते पण पुढे काही झाले नाही.अशा पद्धतीने आरोपींना मिळत असलेले अभय बघून शेवटी कंटाळून मी दि २६ एप्रिल रोजी आपले कार्यालयासमोर दिनांक १३ मे रोजी नाविलाजास्तव आत्मदहन करणार असल्या बाबतचे निवेदन दिले होते सदरच्या निवेदनाला अनुसरून दि १० मे व ११ मे रोजी मला सहाय्यक पोलीस निरीक्षक कळे, पोलीस उपअधीक्षक पन्हाळा, कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री यांनी बोलावून सदर प्रकरणात दहा दिवसांच्या आत तपास करून कारवाई करण्याचे आश्वासन देऊन आत्मदहन स्थगित करण्यास भाग पाडले होते. पण तरीही आश्वासन देऊन देखील सदर प्रकरणात तपासाला गती मिळालेली नाही व आरोपींवर कारवाई झालेली नाही. जे काही गुन्हे दाखल केले आहेत ते फक्त कागदावरच राहिलेले आहेत. आरोपींवर मोठा राजकीय वरदहस्त असल्याने त्यांना अभय मिळत आहे मी न्याय मागून आता थकलेलो आहे. प्रस्तुत प्रकरणात १५ दिवसात काही हालचाली झाल्या नाही तर मी जगून काही उपयोग नाही कारण यातील आरोपींनी माझे जगणे मुश्किल केले आहे. माझाच व्यवसाय बंद पाडून माझी बदनामी केली आहे. तसेच हे प्रकरण मिटव म्हणून मला दररोज सावकारांच्या हस्तकांकरवी रस्त्यावर अडवून धमकी देत आहेत.त्यामुळे मला न्याय मिळण्यासाठी माझ्याकडे शेवटचा पर्याय म्हणून मी मंत्रालय मुंबई समोर माझे कुटुंबासह १६ जून २०२५ रोजी आत्मदहन करत आहे. आम्ही मेल्यावर तरी सत्य बाहेर येईलच या उद्देशाने मी हे पाऊल उचलत आहे.
त्यामुळे पंधरा दिवसांच्या आत कारवाई झाली नाही तर मी कुटुंबासह आत्मदहन करणार असल्याचा इशारा विठ्ठल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना व इतर सर्व संबंधित विभागांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

Advertisements
Advertisements