Advertisements
सातारा : जावळी तालुक्यातील मेरुलिंग घाटात एक चारचाकी वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३ जण ठार झाले आहेत तर ५ जण जखमी झाले आहेत. घाटातील वळणावर अंदाज न आल्याने ही गाडी थेट दरीमध्ये कोसळली. या अपघातात वाहनाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
Advertisements
रेशनिंग धान्य आणण्याकरीता जात असताना मेरुलिंग घाटात एका वळणाचा अंदाज न आल्यामुळे गाडी थेट दरीमध्ये उलटी पलटी होऊन कोसळली. सदर अपघातात जखमी झालेल्या ५ जणांना मेढा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
Advertisements
Advertisements