शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या आझाद मैदानतील आंदोलनातून साधला जुन्या पेन्शन मिळण्याचा राजमार्ग… प्रा. विजय शिरोळकर
हेरले /(प्रतिनिधी):-आझाद मैदान मुंबई येथे १७ ते २१ मार्च अखेर आंदोलन पार पडले. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठकीसाठी संघटनेने राज्याध्यक्ष प्रा. विजय शिरोळकर, प्रा. योगेश्वर निकम, प्रा. संपत कदम,भास्कर देशमुख काकासाहेब कोल्हे सहभागी झाले होते. शिक्षण मंत्र्यांनी यूपीएस/ एनपीएस स्वीकार करावा म्हणून आग्रह केला. पण २००५ पूर्वी टप्पा अनुदान असणारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आपला प्रस्ताव स्वीकारू शकत नाही असे ठामपणे सांगितले. टप्पा अनुदानावर २००५ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांच्यासाठी समिती नेमली होती, त्या समितीचा अहवालानुसार जुनी पेन्शन देण्यात यावी याकरिता आग्रह धरला.शिक्षण मंत्र्यांनी निवेदनावरती टिपणी टाकून कार्यवाही करिता शिक्षण सचिव यांना आदेशित केले. आपला विषय अधिकृतरित्या शिक्षण सचिवांच्याकडे पोहोचलेने जुने पेन्शनची दारे उघडली गेली हे आंदोलनामुळे मिळालेले यश हेही नसे थोडक असा आशावाद संघटनेने व्यक्त केला. पुढे शिक्षण सचिवांच्याकडे कार्यवाहीसाठी गेलेले निवेदनाआधारे प्रस्ताव तयार करून तो अर्थ खात्याकडे पाठवावा यासाठी नाम.प्रकाश आबिटकर,नाम.चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे प्रा. शिरोळकर म्हणाले.
बीड जिल्हाध्यक्ष प्रा.गवते यांनी अभ्यागताच्या भेटीचे नियोजन उत्तमप्रकारे पार पाडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गटाचे आमदार विजयसिंह पंडित, गेवराई बीड यांनी आंदोलनास भेट देऊन, दादांच्याकडे हा विषय ताकतीने मांडू असे आश्वासित केले. शिक्षक आमदार सुधाकर अडबाले ,शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांची भेट घेऊन संघटनेने चर्चा केली. आंदोलनास कार्यसम्राट आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आंदोलनास भेट देऊन पेन्शन मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा विश्वास दिला. आमदार नाना पटोले यांनी भेट देऊन तुमचा विषय काँग्रेस पक्ष विधानसभेमध्ये ताकतीने मांडेल असे आश्वासित केले. माजी आमदार श्रीकांत देशपांडे , कायम विनाअनुदानित शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे पेन्शन संघर्ष समितीच्या संगीताताई शिंदे, सचिन पगार , शिक्षक नेत्या शुभांगीताई पाटील , वितेश खांडेकर, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष तानाजीराव माने व पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन मार्गदर्शन करुन जाहीर पाठिंबा दिला.आझाद मैदान आंदोलन यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष प्रा. योगेश्वर निकम, उपाध्यक्ष प्रा. संपत कदम, कोषाध्यक्ष प्रा. तानाजी शेळके, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख अजित सावंत संपर्कप्रमुख भास्कर देशमुख , ठाणे जिल्हाध्यक्ष राजू लहासे काकासाहेब कोल्हे, प्रा.निशिकांत कडू, आदी प्रयत्न केले. बहुतांश जिल्हाध्यक्ष, , पदाअधिकारी , मयत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय, पेन्शनग्रस्त बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.