Home कोल्हापूर जिल्हा प्रत्येक गावातील गटतट बाजूला ठेवून विकास करणार- आमदार अशोकराव माने

प्रत्येक गावातील गटतट बाजूला ठेवून विकास करणार- आमदार अशोकराव माने

Advertisements

फोटो- खोची येथील नानिवळे धरणग्रस्त वसाहत येथे रस्ता कामाचा शुभारंभ करताना दलित मित्र आमदार अशोकराव माने व मान्यवर

Advertisements

 

 

प्रत्येक गावातील गटतट बाजूला ठेवून विकास करणार- आमदार अशोकराव माने

 

खोची,(भक्ती गायकवाड):- खोचीसह मतदारसंघातील प्रत्येक गावात विकास करताना राजकारण व गावातील गटतट बाजूला ठेवून विकास करणार आहे.तसेच कोणत्याही कामासाठी मतदारसंघातील नागरिकांना अडकून ठेवणार नाही.आपल्या गावात कोणते काम प्राधान्याने करावे लागणार आहे.त्यासाठी ग्रामपंचायत कडून त्या कामाचा ठराव देणे महत्त्वाचे असते.हे गावातील पदाधिकारी,नागरिकांनी प्राधान्याने लक्षात ठेवून त्या दृष्टीने प्रयत्न करावे.प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करीन, अशी ग्वाही हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी दिली.

ते खोची ता.हातकणंगले येथील नानिवळे वसाहत येथे आ.विनयरावजी कोरे व आ. अशोकराव माने यांच्या प्रयत्नातून २५१५ योजनेमधून मंजूर झालेल्या पाच लाख रुपये खर्चाच्या अंतर्गत रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रोहिणी पाटील होत्या. यावेळी प्रा.बी.के.चव्हाण,वारणा दूध संघाचे संचालक दिपकराव पाटील,पंचायत समिती माजी सदस्य वसंतराव गुरव,भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील प्रमुख उपस्थित होते.

यावेळी प्रा.बी.के.चव्हाण, वसंतराव गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास उपसरपंच सुहास गुरव, ग्रामपंचायत सदस्य जगदीश पाटील,अभिजीत चव्हाण,प्रमोद गुरव,प्रमोद सूर्यवंशी,पुनम गुरव, ग्रामविकास अधिकारी आर एस मगदूम तलाठी प्रमोद पाटील तसेच गणपती शिंदे,महेश पाटील,दिलीप पाटील,दिनकर पाटील,धनाजी गुरव,आनंदराव पाटील,जालिंदर पाटील,अरविंद बाबर, उत्तम पाटील,बाळासो बामणे,राम जाधव,दादा पाटील,पोपट गुरव, ठेकेदार अमर पाटील,आण्णा आकेरकर,शिवाजी पाटील,मधुकर सुतार आदी प्रमुख उपस्थित होते.

 

Advertisements
Advertisements